बाप रे ! साडूनेच साडूचा काटा काढला, “घरी बोलावून दारू पाजली आणि त्याच्यासोबत..” पहा सविस्तर बातमी.

कोणाचा अंत कधी कसा आनि कोन करील काही सांगता येत नाही, अशीच एक घटना वर्धा मध्ये घडली आहे. स्वताच्या बायकोच्या बहिण्याच्या खोत बोलून त्याच्यासोबत अनुचित प्रकार केला आहे. अश्या काही गोष्टींमुळे नात्यावरील विश्वास उडून जातो, भरवसा राहत नाही. अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे. साडू-साडू म्हणून मिरवलं, दारुत विष कालवत संपवलं. असं का केलं याबद्दल अशी बातमी देखील पुढे पाहू
सासुरवाडीच्या पाच एकर शेतीच्या हिस्सेवाटणीच्या कारणातून झालेल्या वादात दारुत विषप्रयोग करुन साडभावाची ठंड डोक्याने निष्ठूर हत्या केल्याची घटना वर्धा जिल्ह्यातून समोर आली आहे. अशी प्राथमिक माहिती हातात येते. या दारूतून विषचा उपयोग करून साडूनेच साडूचा निघृणपणे खून केला. वर्धा जिल्ह्यात ही बातमी घडलेल्या सेलू तालुक्यातील जुनागड येथील पिंपळे या ठिकाणी हा प्रकार घडला.
या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र तपासाअंती या घटनेचा पूर्ण घटनाक्रम लक्षात आला. आणि सत्य बाहेर आले आहे याबाबतची माहिती अशी आहे कि, पाच एकर शेतीच्या हिस्सेवाटणीच्या कारणातून झालेल्या वाद झाला आणि याच वादातून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृतकाचा साडभाऊ असलेल्या मुख्य आरोपीसह विष आणणाऱ्या दोघांना सेलू पोलिसांनी अटक केलीय. मोरेश्वर मारोतराव पिंपळे (वय 34) असे मृतकाचे नाव आहे. अटक केलेल्यात मुख्य आरोपी संदीप रामदेव पिंपळे याच्यासह विष आणून देणाऱ्या विजयसिंह चितोडीया, राजकुमार चितोडीया दोन्हींचा समावेश आहे.
18 ऑगस्टच्या रात्रीच्या सुमारास स्वतःच्या घरातच दारुचा घोट रिचवला. मात्र, काही मिनिटांतच तो जमिनीवर कोसळला, त्याची दातखिळ बसली. घरातील सदस्यांनी मोरेश्वरला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र तपासाअंती आणि पंचनामा केल्यानंतर या ठिकाणी संशय यायला सुरुवात झाली आणि त्याच संशयातून तपास केला.
घटनास्थळी जात पंचनामा केला असता संशय बळावला. तिथे दारुची बाटली पडलेली होती. बाटलीतून उग्रवास आणि झाकणावरील बारीक छिद्रांमुळे घातपात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तपासाची चक्रे वेगाने फिरविली आणि त्यानंतर काय घडले ते पुढे आलं. त्यानंतर साडू भाऊ याला पकडला असता त्याची विचारपूस केली असता आरोपीने सासऱ्याच्या असलेल्या पाच एकर सामाईक शेतीच्या हिस्सेवाटणीवरुन झालेल्या वादाचा राग काढला. त्याने दारुत विषप्रयोग करुन मोरेश्वरला ठार मारल्याची कबूली पोलिसांना दिली.
सहा महिन्यांपासून तो हत्येच्या प्रयत्नात होता. आरोपीने दारुची बाटली विकत घेऊन ती मृतक मोरेश्वर याच्या घरासमोर फेकून दिली आणि त्याला दारू बाहेर ठेवली असल्याच सांगितलं. त्यानंतर मोरेश्वरने जेवण केले आणि रात्रीच्या सुमारास दारुचा घोट रिचवला. मात्र, तो दारुचा घोट त्याचाच काळ ठरला. आरोपी संदीप हा शिक्षणात कमी आहे. मात्र, त्याने ठंड डोक्याने केलेल्या निष्ठूर हत्येने पोलीसही आवाक राहिले.
पोलीस आणि मुख्य आरोपी अन्य दोघा तिघांना अटक करण्यात आलेली आहे. जडीबुटी विकणाऱ्या करणं हे विष आणलं होतं हे देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे जडीबुटीचा व्यवसाय करणाऱ्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.