पश्चिम महाराष्ट्र

पुणे: चालकाचं नियंत्रण सुटलं, ट्रॅक्टरचा अपघात, ट्रॉलीत बसलेल्या ३ महिला जागीच ठार तर…

राज्यात अपघात प्रमाण दिवस वाढत आहे ,चालू बस जळणे या दुर्घटनेने महाराष्ट्र शोकाकुल झाला होता यात भर एक अजून घटना घडली , मजुरी साठी जाणर्या मत भगिनीवर दुखाचा डोंन्गर कोसळला आहे ,हा अपघात दौंड तालुक्यातील रावणगाव मध्ये टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन ट्रॉलीत बसलेल्या ३ महिलांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर ५ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

रावणगावमध्ये ट्रॅक्टरमधून शेतातील टोमॅटोची वाहतूक सुरु होती. टोमॅटोचे ७५ ते ८० कॅरेट ट्रॉलीमध्ये होते. टोमॅटो घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतातून बाहेर पडताना खडकवासला कालव्याच्या ३२ व्या क्रमांकाच्या वितरीकेवरुन निघाला होता. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॉलीत बसून निघालेल्या ९ महिला या ट्रॉलीखाली सापडल्या.

दरम्यान, रावणगाव परिसरातील या महिला होत्या. उपचारादरम्यान यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित महिलांवर दौंड व भिगवण येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!