<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>Farmer &#8211; News Mall 18</title>
	<atom:link href="https://newsmall18.com/tag/farmer/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://newsmall18.com</link>
	<description>हा आहे बातम्याचा मॉल!</description>
	<lastBuildDate>Sun, 09 Oct 2022 10:07:10 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.9.4</generator>

<image>
	<url>https://newsmall18.com/wp-content/uploads/2025/06/cropped-fev_v2-32x32.png</url>
	<title>Farmer &#8211; News Mall 18</title>
	<link>https://newsmall18.com</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>बापरे ! शेतकरी झाडाची पाने तोडायला गेला अन् वाघ येताच होत्याचं नव्हतं झालं…</title>
		<link>https://newsmall18.com/bapre-the-farmer-went-to-cut-the-leaves-of-the-tree-and-the-tiger-did-not/</link>
		
		<dc:creator><![CDATA[News Mall18]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 09 Oct 2022 09:54:37 +0000</pubDate>
				<category><![CDATA[माझं गाव]]></category>
		<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<category><![CDATA[Ahmednagar]]></category>
		<category><![CDATA[Bapre! The farmer went to cut the leaves of the tree and the tiger did not...]]></category>
		<category><![CDATA[Crime]]></category>
		<category><![CDATA[Farmer]]></category>
		<category><![CDATA[MAHARASHTRA STATE]]></category>
		<category><![CDATA[Viral News]]></category>
		<category><![CDATA[बापरे! झाडाची पाने तोडायला गेला शेतकरी अन् वाघाने केलं होत्याचं नव्हतं…]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newsmall18.com/?p=5575</guid>

					<description><![CDATA[शेत शेतकरी कामासाठी जात असतो , वन्य जीव मोठ्या प्रमाणत शेत शिवारात येतात ,पशुधन हल्ला करत आहेत .देशपूरमध्येही वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठेमाजी आत्रामचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाचगडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाने दुसऱ्या एका शेतकऱ्यावर हल्ला केला, या हल्ल्यातली शेतकरी आनंदराव दुधबळे याचा मृत्यू झाला. या &#8230;]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>शेत शेतकरी कामासाठी जात असतो , वन्य जीव मोठ्या प्रमाणत शेत शिवारात येतात ,पशुधन हल्ला करत आहेत .देशपूरमध्येही वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठेमाजी आत्रामचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच<br>गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाने दुसऱ्या एका शेतकऱ्यावर हल्ला केला, या हल्ल्यातली शेतकरी आनंदराव दुधबळे याचा मृत्यू झाला. या घटनेमुळं खळबळ माजल्याने नागरिकांमध्ये वन विभागा विरोधात संतापाची लाट उसळली.</p>



<p>वाघांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून आज पुन्हा एकदा वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केला.आरमोरी शहाराजवळ असलेल्या रामाळा येथे ही थरारक घटना घडली. शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेली शिंदी वृक्षाची पाने तोडण्यासाठी एक शेतकरी जंगलात गेला होता. त्यानंतर समोरूनयेणाऱ्या वाघाने शेतकऱ्यावर झडप घातली.</p>



<p>या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. आनंदराव दुधबळे असं मृत पावलेल्या शेतकऱ्याचं नावं आहे. या धक्कादायक घटनेमुळं येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>कृषी वार्ता : देखावा करायला नेते आले आणि खालीहात तसेच गेले, शेतकरी मात्र..</title>
		<link>https://newsmall18.com/agriculture-news-only-leaders-came-and-went-but-farmers-remained-hungry/</link>
		
		<dc:creator><![CDATA[News Mall18]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 21 Aug 2022 05:55:38 +0000</pubDate>
				<category><![CDATA[कृषी खबर]]></category>
		<category><![CDATA[Agriculture news: Only leaders came and went]]></category>
		<category><![CDATA[Farmer]]></category>
		<category><![CDATA[MAHARASHTRA STATE]]></category>
		<category><![CDATA[Political]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newsmall18.com/?p=3524</guid>

					<description><![CDATA[बळीराजा सुखी भवं ! असं म्हटलं जातं मात्र हाच बळीराजा एखाद्या नैसर्गिक संकट आलं की तो मेटाकुटीला येतो, नैसर्गिक संकटाचा पहिला फटका हा बळीराजाला बसतो . तो आर्थिक संकटात सापडतो मात्र त्याचे त्याच्या समोर अनेक आव्हानं उभी असतात. यंदाच्या वर्षी विदर्भात पावसाने थैमान घातला, मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी झाला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. सर्व &#8230;]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>बळीराजा सुखी भवं ! असं म्हटलं जातं मात्र हाच बळीराजा एखाद्या नैसर्गिक संकट आलं की तो मेटाकुटीला येतो, नैसर्गिक संकटाचा पहिला फटका हा बळीराजाला बसतो . तो आर्थिक संकटात सापडतो मात्र त्याचे त्याच्या समोर अनेक आव्हानं उभी असतात.</p>



<p>यंदाच्या वर्षी विदर्भात पावसाने थैमान घातला, मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी झाला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. सर्व पीक वाहून गेलं, शेतात पाणी शिरल्यानंतर उभा पिकाची नासाडी झाली. काही ठिकाणी पीक वाहून गेलं. तर काही ठिकाणी कोलमडून देखील गेले. काही नेतेमंडळींनी दौरे काढले. तुम्हाला मदत करू, पाहाणी दौरे केले. नुकसान काय झाले? त्याची चौकशी केली मात्र प्रत्यक्षात नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालीच नाही. नुकसान भरपाईचा पत्ताच नाही, त्यामुळे आणखी किती दौरे करणार साहेब मदत द्या असा संतप्त सवाल बेहाल झालेले शेतकरी उपस्थित करत आहेत.</p>



<p>जुलै महिन्यातील अतिवृष्टीने पिकांना मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, नुकसानभरपाईचे पाहणे उपमुख्यमंत्री ,कृषिमंत्री, विरोधी पक्ष नेते , केंद्रीय समिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे शिष्टमंडळ यांनी या ठिकाणी दौरे केले. दौरे झाले मात्र मदत काही झाले नाही. सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुले शेतात पाणी गेल्याने पिके खरडून गेली. या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला होत.त्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत.</p>



<p>हवालदिल शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे, माजी पालकमंत्री सुनील केदार आदी नेते येऊन गेले&#8217;.मात्र मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कमालीचा रोष व्यक्त केला आता आश्वासन नको आर्थिक मदत पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणतात . अनेक भागात पावसामुळे बांध फुटले होते, त्यामुळे पिकांचे नुकसान झालं. सदर पावसाने नुकसान होते त्या ठिकाणी ते 30 टक्के नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. एकही बाधित शेतकरी हा मदतीपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन कृषिमंत्र्यांनी यंत्रणेला दिले. मात्र ही मदत शेतकऱ्यांच्या दारापर्यंत ,बांधापर्यंत कधी पोहोचले हे पाहणे फार महत्त्वाच आहे.</p>



<p></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>दुखःद : शेतात फवारणीसाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा या कारणाने झाला मृत्यू, पाहा काय आहे कारण.</title>
		<link>https://newsmall18.com/tragedy-a-young-farmer-who-went-to-spray-the-field-died-due-to-this-see-what-is-the-reason/</link>
		
		<dc:creator><![CDATA[News Mall18]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 08 Aug 2022 19:40:54 +0000</pubDate>
				<category><![CDATA[कृषी खबर]]></category>
		<category><![CDATA[CMo Ekanth Shinde]]></category>
		<category><![CDATA[DCMO Devendra Fadanvis]]></category>
		<category><![CDATA[Death]]></category>
		<category><![CDATA[Farmer]]></category>
		<category><![CDATA[MAHARASHTRA STATE]]></category>
		<category><![CDATA[Parbhani]]></category>
		<category><![CDATA[see what is the reason.]]></category>
		<category><![CDATA[Tragedy: A young farmer who went to spray the field died due to this]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newsmall18.com/?p=2910</guid>

					<description><![CDATA[सध्या पावसा पाण्याची दिवस चालू आहेत. पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर काही शेतकरी वर्ग शेतात असलेल्या पिकांवर औषध फवारणी करतात. पण हे औषध फवारणी करत असताना आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची असते. जेणेकरून हे विषारी औषध आपल्या नाका तोंडात जाऊ नये आणि त्यामुळे आपल्याला काही इजा होणार नाही. पण परभणी जिल्ह्यामध्ये एक घटना घडली आहे. शेतातल्या &#8230;]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>सध्या पावसा पाण्याची दिवस चालू आहेत. पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर काही शेतकरी वर्ग शेतात असलेल्या पिकांवर औषध फवारणी करतात. पण हे औषध फवारणी करत असताना आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची असते. जेणेकरून हे विषारी औषध आपल्या नाका तोंडात जाऊ नये आणि त्यामुळे आपल्याला काही इजा होणार नाही.</p>



<p>पण परभणी जिल्ह्यामध्ये एक घटना घडली आहे. शेतातल्या कापसाच्या पिकावर औषध फवारणी करायची असते आणि म्हणून हा तरुण शेतकरी कीटकनाशकाच्या डब्याचे झाकण उघडतो आणि झाकण उघडतात ते कीटकनाशक त्याच्या तोंडात जाते. हे कीटकनाशकाच्या तोंडात जाण्याने 19 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदरील घटना सेलू तालुक्यातील आहे. हि घटना रविवारी घडली आहे.</p>



<p>योगेश गणेश मगर असे या मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. योगेश हा रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कापसाच्या पिकावर औषधाची फवारणी करायची म्हणून जातो. त्या फवारणीची पूर्वतयारी म्हणून तो त्या औषधाच्या डब्याचे झाकण उघडतो, आणि झाकण उघडताना त्या कीटकनाशकचा काही अंश त्याचा तोंडात जातो. आणि यानंतर या योगेशला मळमळ, उलटी, चक्कर असं जाणवायला लागलं. योगेशचा त्रास वाढत गेला आणि मग योगेशला उपचारासाठी सेलू येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला.</p>



<p>खाजगी दवाखान्यांमध्ये योगेश्वर उपचार चालू असताना रविवारी दुपारी ४ च्या दरम्यान त्याचा मृत्यू होतो. सेलू ठाण्यात या प्रकरणी आकस्मात मृतूची नोंद केली गेली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक गाडेवाढ कर्मचारी गौस यांनी भेट दिली.</p>



<p>पिकांवर फवारणी करत असताना योग्य ती काळजी घेतली नाही, म्हणून 19 वर्षीय योगेशचा मृत्यू झाला. औषधाची फवारणी करत असताना व्यवस्थित काळजी घेतली असती, तर योगेश सोबत आज ही घटना घडली नसती. त्यामुळे आपण शेतात औषधांची फवारणी करत असताना तोंडात ते औषध जाणार नाही याची पूर्व ती तयारी करावी. शक्यतो तोंडाला आणि नाकाला मास्क लावावे जेणेकरून औषधाचा वास किंवा औषधाचा अंश आपल्या नाका-तोंडात जाणार नाही.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>सावधान ! तुमचीही ऑनलाइन फसवणूक होऊ शकते, नांदगाव तांडा येथील शेतकऱ्याची ३४८०० रु.ची फसवणूक.</title>
		<link>https://newsmall18.com/beware-you-too-can-get-cheated-online-farmer-from-nandgaon-tanda-cheated-for-rs-34800/</link>
		
		<dc:creator><![CDATA[News Mall18]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 24 Jul 2022 04:03:49 +0000</pubDate>
				<category><![CDATA[गुन्हेगारी]]></category>
		<category><![CDATA[Beware! You too can get cheated online... Farmer from Nandgaon Tanda cheated for Rs 34800]]></category>
		<category><![CDATA[Crime]]></category>
		<category><![CDATA[Farmer]]></category>
		<category><![CDATA[MAHARASHTRA STATE]]></category>
		<category><![CDATA[online froad]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newsmall18.com/?p=2418</guid>

					<description><![CDATA[सोयगाव:-विजय चौधरी तालुका प्रतिनिधी तुमचे फोन पे नादुरुस्त आहे त्यामुळे फोन पे दुरुस्त करून घ्या असा सल्ला देत परराज्यातील टोलक्याने नांदगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याला ऑनलाइन बँकिंग मध्ये ३४ हजार ८०० रुपयांचा गंडा घातला हा प्रकार शनिवारी उघडीस आला याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे जितेश रणसिंग चव्हाण (वय २१) हा शेतकरी तरुण फोन पे &#8230;]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>सोयगाव:-विजय चौधरी तालुका प्रतिनिधी</p>



<p>तुमचे फोन पे नादुरुस्त आहे त्यामुळे फोन पे दुरुस्त करून घ्या असा सल्ला देत परराज्यातील टोलक्याने नांदगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याला ऑनलाइन बँकिंग मध्ये ३४ हजार ८०० रुपयांचा गंडा घातला हा प्रकार शनिवारी उघडीस आला याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे जितेश रणसिंग चव्हाण (वय २१) हा शेतकरी तरुण फोन पे वरून बँकिंगचे व्यवहार करायचा त्याला कानपूर वरून काही दिवसापूर्वी फोन आला आम्ही फोन पे सर्वेक्षण करीत आहोत तुमचे फोन पे नादुरुस्त झाले आहे त्यामुळे त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक संदेश पाठवतो असे सांगितले त्यानंतर समोरून संदेश आल्यानंतर जितेशला एक ओटीपी आला जितेशने तो ओटीपी समोरच्याला दिल्यानंतर त्याच्या खात्यातील पहिल्या टप्प्यात ४८०० रुपये त्यानंतर तीन वेळा १० हजार असे एकूण ३४ हजार ८०० रुपये खात्यावरून गायब झाले याबाबत जितेश रणसिंग चव्हाण यांनी पोलिसांच्या सायबर सेल कडे तक्रार दाखल केली आहे याबाबत गुन्हा दाखल झालेला नाही</p>



<p>चौकट:-<br>सोयगाव तालुक्यात ऑनलाईन बँकिंग व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांनी अनोळखी व्यक्तीशी ऑनलाईन व्यवहार करू नये व आपल्या खात्याच्या ओटीपी ची गोपनीयता बाळगावी कोणताही गैरप्रकार आढळल्यास तातडीने सोयगाव पोलीस ठाण्याची संपर्क साधावा अशी माहिती सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी दिली आहे</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>नगर वार्ता : कोपरगाव येथील शेतकऱ्याची फाशी घेऊन आत्महत्या.</title>
		<link>https://newsmall18.com/city-news-a-farmer-from-kopargaon-committed-suicide-by-hanging/</link>
		
		<dc:creator><![CDATA[News Mall18]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 19 Jul 2022 08:16:03 +0000</pubDate>
				<category><![CDATA[माझं गाव]]></category>
		<category><![CDATA[Ahmednagar]]></category>
		<category><![CDATA[Death]]></category>
		<category><![CDATA[Farmer]]></category>
		<category><![CDATA[Hanging]]></category>
		<category><![CDATA[MAHARASHTRA STATE]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newsmall18.com/?p=2237</guid>

					<description><![CDATA[भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि अश्या कृषिप्रधान देशात्मध्ये शेतकरी आत्महत्या नवीन नाही आहे. त्याचे कारण आहे ते म्हणजे या देशातील राजकरण आणि इथले भ्रष्टाचार. अक्षर दुष्काळाच्या झळा सोसून बळीराजा बऱ्याचदा आत्महत्या करतो. मात्र भर पावसाळ्यातही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. कधीकधी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा दाखल झाला आणि त्यामुळेच नगर &#8230;]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि अश्या कृषिप्रधान देशात्मध्ये शेतकरी आत्महत्या नवीन नाही आहे. त्याचे कारण आहे ते म्हणजे या देशातील राजकरण आणि इथले भ्रष्टाचार. अक्षर दुष्काळाच्या झळा सोसून बळीराजा बऱ्याचदा आत्महत्या करतो. मात्र भर पावसाळ्यातही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. कधीकधी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा दाखल झाला आणि त्यामुळेच नगर तालुक्यातील एका शेतकऱ्यांना गळफास घेऊन आपले जीवन संपवले.</p>



<p>अशीच एक घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या दिलीप दिनकर निकम ( वय 50 ) यांनी आपल्या राहत्या घरासमोर सकाळी सहाच्या दरम्यान कांद्याच्या चाळीत लोखंडी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या इसमाच्या मयताच्या भावाने ( मोतीराम निकम वय 35 ) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या बातमीने सुरेगाव मध्ये सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे.</p>



<p>मिळालेल्या माहितीनुसार मयत निकम यांच्या घरामध्ये जमिनीच्या कारणावरून बऱ्याच वर्षापासून अंतर्गत वाद चालू होते. आणि या वादामुळे शेती पडीक पडली होती. शेती पडीक असल्यामुळेजे शेतीतून मिळणारा उत्पन्नाचा सोर्स होता तो बंद झाला. आणि त्यामुळे मोठ्या अडचणी येऊ लागल्या. त्यातच मुला मुलीचे विवाह जमवण्यात अडचणी येत होत्या. आणि यामुळे ते मयत निकम हे तणावाखाली जगत होते. त्यातच मयत निकम हे वडिलांपासून अविभक्त राहत होते. आणि त्यांना उत्पन्नाची साधन नसल्याने ते कायम तणावात राहत होते. आणि अखेर निकम यांनी निराश होऊन हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. </p>



<p>त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. त्यातूनही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याचप्रमाणे पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चव्हाण हे करत आहेत. घरामध्ये चालू असलेल्या वादविवादामुळे निकम यांना अखेर आत्महत्या हा पर्याय निवडावा लागला. आणि निकम कुटुंबियांनी त्यांच्या घरातील कर्ताकरविता माणसाला गमावले.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>नगर ब्रेकिंग : कर्जबाजारपणाला कंटाळून ज्ञानेश्वर कांबळे यांनी केली आत्महत्या.</title>
		<link>https://newsmall18.com/dnyaneshwar-kamble-committed-suicide-as-he-was-fed-up-with-the-tragic-debt-market/</link>
		
		<dc:creator><![CDATA[News Mall18]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 09 Jul 2022 06:38:36 +0000</pubDate>
				<category><![CDATA[आत्ताची बातमी]]></category>
		<category><![CDATA[माझं गाव]]></category>
		<category><![CDATA[Ahmednagar]]></category>
		<category><![CDATA[Farmer]]></category>
		<category><![CDATA[Loan]]></category>
		<category><![CDATA[MAHARASHTRA STATE]]></category>
		<category><![CDATA[Sucide]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newsmall18.com/?p=1964</guid>

					<description><![CDATA[कर्जाचा मोठा डोंगर डोक्यावर असल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि अश्या कृषिप्रधान देशात्मध्ये शेतकरी आत्महत्या नवीन नाही आहे. त्याचे कारण आहे ते म्हणजे या देशातील राजकरण आणि इथले भ्रष्टाचार. अक्षर दुष्काळाच्या झळा सोसून बळीराजा बऱ्याचदा आत्महत्या करतो. मात्र भर पावसाळ्यातही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. कधीकधी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी &#8230;]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p><strong>कर्जाचा मोठा डोंगर डोक्यावर असल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.</strong></p>



<p>भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि अश्या कृषिप्रधान देशात्मध्ये शेतकरी आत्महत्या नवीन नाही आहे. त्याचे कारण आहे ते म्हणजे या देशातील राजकरण आणि इथले भ्रष्टाचार. अक्षर दुष्काळाच्या झळा सोसून बळीराजा बऱ्याचदा आत्महत्या करतो. मात्र भर पावसाळ्यातही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. कधीकधी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा दाखल झाला आणि त्यामुळेच नगर तालुक्यातील एका शेतकऱ्यांना गळफास घेऊन आपले जीवन संपवले. नगर तालुक्यातील पारगाव मौला या गावाच्या शिवारात सायंकाळच्या सुमारास बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन ज्ञानेश्वर कोंडीबा कांबळे वय वर्षे 45 या शेतकऱ्याने आत्महत्या केली.</p>



<p>आपल्या घराच्या पाठीमागे शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेली ही बाब त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला कांबळे यांच्या पाठीमागे यावर्षी पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवलं होता. डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर आणि त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले अशी चर्चा गावांमध्ये रंगू लागली आहे. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. ज्ञानेश्वर कांबळे यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगा एक मुलगी तीन भाऊ असा परिवार आहे आणि वडील सुद्धा आहेत.</p>



<p>वरुणराजा शेतकर्यां वरती नाराज झाला की, हा पाऊस लांबतो आणि पाऊस लांबला की दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येत असते. या शेतकऱ्यांनी उन्हाळी काम संपलं की शेतीची मशागत करून नव्या पिकासाठी शेत तयार करून त्यामध्ये पेरणी करणे त्याचबरोबर पेरणी साठी लागणारी बैलजोडी कुठलं यंत्र या सगळ्याची तडजोड करत असताना शेतकरी मेटाकुटीला येतो. एवढं करूनही पाऊस नाही आला आणि आपलं पिक नाही उगवलं तर अस्मानी संकट शेतकर्यां वरती उगवले जातात. त्यामुळे शेतकरी असा टोकाचा निर्णय घेतात. बीड जिल्हामध्ये दर दिवसाला एक आत्महत्या हे ठरलेले गणित आहे. कृषी प्रधान देशात बळीराजा सुंदर अशा पद्धतीने दिवसेंदिवस आत्महत्या करत असेल तर खऱ्या अर्थानं या देशाचा काळा चेहरा आपल्यासमोर येतोय असं म्हणायला काही हरकत नाही.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>काळीज पिळवटून टाकणारी घटना, वडिलांच्या डोळ्यासमोरच पाच वर्षाच्या चिमुकल्यासोबत घडलं असं काही !</title>
		<link>https://newsmall18.com/a-heartbreaking-incident-something-that-happened-to-a-five-year-old-girl-right-in-front-of-her-fathers-eyes/</link>
		
		<dc:creator><![CDATA[News Mall18]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 05 Jul 2022 07:30:40 +0000</pubDate>
				<category><![CDATA[माझं गाव]]></category>
		<category><![CDATA[Accident]]></category>
		<category><![CDATA[Farmer]]></category>
		<category><![CDATA[Killed]]></category>
		<category><![CDATA[MAHARASHTRA STATE]]></category>
		<category><![CDATA[Son]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newsmall18.com/?p=1850</guid>

					<description><![CDATA[लहान मुलं हे किती करामती असतात हे आपणा सगळ्यांना माहित आहे. लहान मुलं ही देवाघरची फुले असे म्हटले जाते. या लहान मुलांमध्ये खूप हट्टी स्वभाव पण असतो. एखादी गोष्ट आवडल्यास ती गोष्ट करण्यासाठीचा हट्ट धरला जातो. खेळणी असेल, गाड्या असतील, मोबाईल, टीव्ही यासाठी सुद्धा जास्त आकर्षित असतात. आपल्या घरातला कोणी व्यक्ती जर समजा बाहेर जात &#8230;]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>लहान मुलं हे किती करामती असतात हे आपणा सगळ्यांना माहित आहे. लहान मुलं ही देवाघरची फुले असे म्हटले जाते. या लहान मुलांमध्ये खूप हट्टी स्वभाव पण असतो. एखादी गोष्ट आवडल्यास ती गोष्ट करण्यासाठीचा हट्ट धरला जातो. खेळणी असेल, गाड्या असतील, मोबाईल, टीव्ही यासाठी सुद्धा जास्त आकर्षित असतात. आपल्या घरातला कोणी व्यक्ती जर समजा बाहेर जात असेल तर त्याच्या पाठीशी लागणे किंवा कोणी गाडी घेऊन जात असेल तर गाडीवर एक चक्कर मारून आणणे असा आग्रह आजकालची मुलं करत असतात.</p>



<p>लहान मुलांचे मन कोणीही तोडत नाही अशीच एक घटना घडली आहे एका दिनकर शिंदे नावाच्या व्यक्तीस पाण्याचा टँकर भरून आणायचा असतो म्हणून तो आपल्या मुलाला घेऊन ट्रॅक्टरवर बसवतो आणि पाणी आणायला म्हणून हे दोघेजण सोबत ट्रॅक्टरमध्ये व्यवस्थित बसतात व तो ट्रॅक्टर घेऊन निघतात पण त्यांचा मुलगा राघव याचा काही अंतर गेल्यानंतर ट्रॅक्टर वरून तोल जातो आणि तसंच तो खाली पडतो तो खाली पडल्यानंतर त्या बसलेल्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील जे डाव्या बाजूचे चाक असते त्या चाकाखाली जाऊन दिनकर यांचा मुलगा राघव गंभीर जखमी होतो व त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो.</p>



<p>राघव व त्याचे वडील हे ध्रुवनगर मधील राहणारे आहेत ते ध्रुव नगर मधील शिंदे चाळ याठिकाणचे रहिवासी आहेत. आपल्या मुलाची दुर्दैवी घटना त्या मुलाचे वडील दिनकर शिंदे यांच्यासमोर रविवारी घडली. ही घटना घडली त्यावेळेस ते स्वतः ट्रॅक्टर चालवत होते. शिवाजीनगर परिसरातील धृवनगर येथील बारा बंगला भागात शिंदे चाळ आहे. या चाळीत राहणारे शिंदे हे ट्रॅक्टरला पाण्याचा टँकर जोडून रविवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान आपल्या मुलाला घेऊन ट्रॅक्टरमध्ये निघतात. आणि त्यावेळेस हा सगळा प्रकार घडतो या झालेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण गृहनगर सह शिंदे चाळीचा परिसर हळहळ व्यक्त करत आहे व संपूर्ण परिसरामध्ये शोककळा व्यक्त केली जात आहे.</p>



<p>मुलाचा हट्ट हा त्या मुलाच्या जीवाशी हा किती महाग पडू शकतो याचे हे उदाहरण आहे आपण आपल्या मुलाचे हट्ट नक्की पूर्ण करा पण ते हट्ट पूर्ण करत असताना तेवढी सुरक्षितता काळजी देखील घ्या</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
	</channel>
</rss>
