<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>Sambhajinagar &#8211; News Mall 18</title>
	<atom:link href="https://newsmall18.com/tag/sambhajinagar/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://newsmall18.com</link>
	<description>हा आहे बातम्याचा मॉल!</description>
	<lastBuildDate>Thu, 28 Jul 2022 07:18:36 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.9.4</generator>

<image>
	<url>https://newsmall18.com/wp-content/uploads/2025/06/cropped-fev_v2-32x32.png</url>
	<title>Sambhajinagar &#8211; News Mall 18</title>
	<link>https://newsmall18.com</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>गेंड्याची कातडी पांघरणाऱ्या प्रशासनामुळे नाहक १० वर्षाचा मुलाचा बळी.</title>
		<link>https://newsmall18.com/nahak-10-year-old-boy-killed-due-to-rhino-skin-covering-administration/</link>
		
		<dc:creator><![CDATA[News Mall18]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 28 Jul 2022 07:18:35 +0000</pubDate>
				<category><![CDATA[गुन्हेगारी]]></category>
		<category><![CDATA[Death]]></category>
		<category><![CDATA[Eknath Shinde]]></category>
		<category><![CDATA[MAHARASHTRA STATE]]></category>
		<category><![CDATA[Road]]></category>
		<category><![CDATA[Sambhajinagar]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newsmall18.com/?p=2510</guid>

					<description><![CDATA[सरकारला नावं ठेवली जातात, मात्र घटनाही अशाच घडतात. ही बातमी वाचून संभाजी नगर मधून अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येतेय. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसामुळे ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत ते रस्ते चिखलमय होतात. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं, रस्त्यांवर चालणे मुश्किल होत. दहा वर्षाच्या लहान मुलाचा अशाच रस्त्याने बळी घेतला आहे. रस्त्याने आणि गेंड्याची कातडी पांघरलेल्या &#8230;]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>सरकारला नावं ठेवली जातात, मात्र घटनाही अशाच घडतात. ही बातमी वाचून संभाजी नगर मधून अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येतेय. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसामुळे ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत ते रस्ते चिखलमय होतात. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं, रस्त्यांवर चालणे मुश्किल होत. दहा वर्षाच्या लहान मुलाचा अशाच रस्त्याने बळी घेतला आहे. रस्त्याने आणि गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारच्या व्यवस्थापनमुळे एका निष्पाप मुलाचा बळी घेतला.</p>



<p>ग्रामीण भागात रस्त्याच्या नावाखाली सगळा चिखल झाला आहे. लाडाकोडात वाढलेल्या मुलाच्या मृत्यूनंतर ही आई हंबरडा फोडते. या अवघ्या दहा वर्षाचा तिचा मुलगा आता या जगात नाही. कारण चिखलमय रस्त्याने तिच्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतला. गंगापुर तालुक्यातील लखमापुर रस्ता हा, याला रस्ता तरी कसं म्हणायचं ? एका आईच्या मुलाला या रस्त्यानं दूर केल्याच आपण पहिले आहे.</p>



<p>ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था अशी चिखलमय झाली आहे, आणि याच चिखल लहानग्या कृष्णाच्या जीवावरती उठला. पोट दुखणे, उलट्या होत असल्याने कृष्णा दवाखान्यात नेण्यासाठी वडिलांनी मोटरसायकल काढली, पण रस्त्यात चिखल होता, त्यांची मोटरसायकल रुतून बसली. मोठ्या कष्टानं तासभराच्या मेहनतीनंतर चिखल माती तुडवत कसाबसा दवाखाना गाठला. पण खूप उशीर झाला होता. वाटेतच कृष्णाचा दुर्दैवी अंत झाला होता. गावातून बाहेर यायचं झालं तर लखमापूर वाला एकच रस्ता असतो अगदी शेतात जायचं असलं तरी त्या वाटेने जावं लागतं. पण ही वाट थेट मृत्यूच्या दारातच नेऊन पोहोचवते या दुर्दैवी घटनेमुळे गावकऱ्यांचा संताप वाढला आहे. वारंवार तक्रारी करून सुस्तावलेली यंत्रणा हा रस्ता दुरुस्त करत नाहीये. वर्षानुवर्षे रखडलेल्या कामामुळे अनेकांना त्रास होतो. तर आज एका मुलाचा जीव देखील गेला. मविआ सरकारच्या काळात रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने हे काम रखडल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे.</p>



<p>हे वृत्त झी २४ तास ने दाखवल्यानंतर हा रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार साहेबांनी दिल, मात्र प्रश्न हा आहे की मुरदाड सरकारी यंत्रणा एकाचा बळी जाण्यापूर्वी जागी का होत नाही ? राज्याच्या काही कानाकोपऱ्यात घडलं की व्हिडिओ कॉल करून मुख्यमंत्री मदतीचा हात देतात. वेळप्रसंगी ते सरकारी यंत्रणेला धारेवर धरतात मात्र तेच मुख्यमंत्री संभाजीनगर रस्त्याकडे लक्ष का देत नाहीत ? त्या आईच्या चिमुकल्या कृष्णाचा बळी घेणाऱ्याचे कान मुख्यमंत्रीसाहेब उपटणार का ? असा सवाल इथले ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>ब्रेकिंग : औरंगाबादच्या नावाबाबत झाला मोठा निर्णय.</title>
		<link>https://newsmall18.com/breaking-a-big-decision-was-made-about-the-name-of-aurangabad/</link>
		
		<dc:creator><![CDATA[News Mall18]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 29 Jun 2022 13:08:57 +0000</pubDate>
				<category><![CDATA[आत्ताची बातमी]]></category>
		<category><![CDATA[व्हाईट कॉलर]]></category>
		<category><![CDATA[Aurangabad]]></category>
		<category><![CDATA[CMO Thackeray]]></category>
		<category><![CDATA[MAHARASHTRA STATE]]></category>
		<category><![CDATA[Sambhajinagar]]></category>
		<category><![CDATA[Udhhav Thackeray]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newsmall18.com/?p=1673</guid>

					<description><![CDATA[आता अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेला विषय मार्गी लावण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला अशी माहिती परीवहन मंत्री अनिल परीब यांनी दिली आहे. आज मंत्रिमंडळात सर्वात मोठा बदल झालाय, अखेर औरंगाबादच्या नामांतराबद्दल तिडा आज मिटलेला आहे औरंगाबादचं नाव बदलेल आहे बैठकीमध्ये औरंगाबादच्या नाव बदलाबद्दल यशस्वी पाऊल उचलण्यात &#8230;]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>आता अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेला विषय मार्गी लावण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला अशी माहिती परीवहन मंत्री अनिल परीब यांनी दिली आहे.</p>



<p>आज मंत्रिमंडळात सर्वात मोठा बदल झालाय, अखेर औरंगाबादच्या नामांतराबद्दल तिडा आज मिटलेला आहे औरंगाबादचं नाव बदलेल आहे बैठकीमध्ये औरंगाबादच्या नाव बदलाबद्दल यशस्वी पाऊल उचलण्यात आले. ठाकरे सरकारकडून हिंदुत्वाचा मुद्दा हा महत्त्वाचा होता आणि याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती औरंगाबादचं नाव हे संभाजीनगर करण्याचं ठरलं होतं. आणि आज कॅबिनेटमध्ये तोच निर्णय घेण्यात आलाय औरंगाबाद च नाव आता संभाजीनगर होणार आहे. आणि त्याचबरोबर उस्मानाबादचे नाव देखील बदल करण्यात आलेला आहे अशी ही माहिती समोर येतील मात्र औरंगाबाद मध्ये अनेक जातीय घडामोडी घडत असतात अनेक संवेदनशील परिस्थिती त्या ठिकाणी आहेत आणि अशाच औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर करण्यात आले ठाकरे सरकारकडून हिंदुत्वाची जी जोपासना आहे किंवा हिंदुत्व जतन करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा ठरलेला होता. आणि सध्याच्या काळामध्ये औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर झाला आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट यावरती आता पूर्ण राज्यात काय पडसाद उठतात हे पाहणं फार महत्त्वाचे ठरेल</p>



<p>1988 मध्ये औरंगाबादच्या सभेत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा हा औरंगाबादचे नाव संभाजीनगर नारा दिला होता. तेव्हापासून औरंगाबादेत शिवसेनेकडून औरंगाबादचे संभाजीनगर असा शहराचा उल्लेल केला जातो. 9 नोव्हेबर 1995 या वर्षात राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी असा प्रस्ताव औरंगाबाद महापालिकेने पाठवला. मात्र 2001 ला काँग्रेस आघाडी सरकाने रद्द ठरवला. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत असताना संभाजीनगरचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावर आता निर्णय होण्याची शक्यता आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
	</channel>
</rss>
