खुशखबर : अखेर पोलीस भरतीची प्रतीक्षा संपली, अशी होणार पोलीस भरती.
महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाहतो की राजकारण व त्यामधील उलथापालथ होत आहे. राजकारणामध्ये एवढ्या काही घडामोडी घडत असताना देखील महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाने पोलीस भरतीसाठी मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल ७231 जागा भरण्यात येणार आहे. आणि त्याबाबतीत जी-आर देखील जाहिर करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.
ही पोलीस भरती दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. यामध्ये ५००० जागांसाठी भरती पूर्ण झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील 72३१ जागांसाठी भरती होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील पोलीस भरतीचे नियम मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी पोलीस संचालकांना सूचना देखील देण्यात आले आहेत.
यामध्ये दुसरा टप्प्यामध्ये भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार व मैदानी चाचणी मध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. मैदानातील चाचणीसाठी खालील प्रमाणे गुण रचना आहे.
पुरुष उमेदवार :
- 1600 मीटर धावणे – 20 गुण
- 100 मीटर धावणे – 15 गुण
- गोळाफेक – 15 गुण
महिला उमेदवार
- 800 मीटर धावणे- 20 गुण
- 100 मीटर धावणे- 15 गुण
- गोळाफेक – 15 गुण
महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलातील ‘सशस्र पोलिस शिपाई’ (पुरूष) पदासाठी 100 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे.
- 5 किमी धावणे- 50 गुण
- 100 मीटर धावणे -25 गुण
- गोळाफेक – 25 गुण
शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार पदानुसार 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
लेखी परीक्षाचे स्वरूप :
- लेखी चाचणीत अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयांवर आधारित प्रश्न असतील. हे प्रश्न बहुपर्यायी प्रकारात असतील.
- परीक्षा मराठी भाषेत होईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल.
- उमेदवारांना लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळवणं अनिवार्य आहे. त्यापेक्षा कमी गुण असल्यास उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
- ही लेखी परीक्षा ‘ओएमआर’ (OMR- Optical Mark Recognition) पद्धतीने घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
मागच्या दोन वर्षापासून जे आपल्या देशावर / जगावर कोरोनाचे संकट आले होते. या सगळ्यामुळे बऱ्याच भरत्यांच्या प्रक्रिया लांबणीवर पडल्या होत्या, त्यातच पोलीस भरती देखील लांबणीवर पडली होती. आपल्या राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बाळाची गरज आहे. आणि आता राज्य सरकारने जो जीआर काढला आहे त्यामुळे पोलीस भरतीसाठी चा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील जे तरुण पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. व त्यांना खूप मोठा दिलासा देखील मिळणार आहे.