घर पाडण्यासाठी अचानक आला गावात जेसीबी; आणि घराबाहेर पळत सुटले सर्व मंडळी, पहा काय आहे प्रकरण.
सध्या संत तुकाराम महाराज पालखी ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या पालखी महामार्गाच्या कामावेळी दौंड तालुक्यातील रोटी गावात मोठा गोंधळ उडाला. रस्ते मार्गासाठी गावातील काही ठिकाणी जमीन अधिग्रहण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे गावातील घरे पाडण्यासाठी प्रशासनातील अधिकारी पोलीस बंदोबस्तासह दाखल झाले. पण सरकारकडून अद्याप मोबदला आम्हाला मिळालेला नसतानाही आम्ही राहतं घर सोडून जाणार कुठे ? असा प्रश्न विचारत गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.
पालखी महामार्गाच्या कामासाठी जमीन अधिग्रहण केलं जात असताना अनेक ठिकाणी नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. “या महामार्गात आमचे राहते घर जाणार आहे. मात्र महसूल प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने घराचे मूल्यांकन केले होते. आम्ही केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून पुनर्मूल्यांकन करण्यात आले. मात्र आम्हाला मोबदला म्हणून किती रक्कम दिली जाणार आहे, याची माहिती अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेलं नाही”, असं म्हणत रोटी गावातील नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या आहेत.
गावातील नागरिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेराव घालत प्रश्न विचारला कि, मूल्यांकनानंतर मोबदला मिळणं तर दूरच मात्र नक्की किती मोबदला दिला जाणार आहे, याची रक्कमही आम्हाला सांगितलेली नाही. असं असताना आम्ही राहतं घर सोडून जाणार कुठे?
नागरिकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर प्रशासनाने दरम्यान, पाडकाम करणं थांबवून ही कारवाई स्थगित केली आहे. मात्र पालखी महामार्गात जाणाऱ्या आमच्या घर आणि जागेचे योग्य मूल्यांकन झाल्याशिवाय आणि त्याची रक्कम कळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका येथील गावकऱ्यांनी घेतली आहे. आता पाहूया कि प्रशासन किती लवकर या लोकांच्या समस्या , प्रश्न सोडणार.