...
पश्चिम महाराष्ट्र

जामखेडचा बालविवाह रोखण्यात यश; पण ” या ” तालुक्यात बालविवाह केल्यामुळे ७ जणांना झाली अटक.

भारतातील 65,000 हून अधिक मुले बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध लागलेला नाही, गेल्या तीन वर्षांत 84% वाढ झाली आहे. 2016 मध्ये महाराष्ट्रात सुमारे 10,000 मुले बेपत्ता झाली. कौटुंबिक आणि कुटूंब नसलेल्या सदस्यांकडून अपहरण आणि अपहरण, बालविवाह, पळून जाणे, तस्करी आणि हरवलेली मुले अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची नोंद होत नाही.बालविवाह ही भारतीय समाजाची ज्वलंत समस्या आहे. भारतातील सुधारित कायदे असूनही, ज्यामध्ये महिलांसाठी विवाहाचे किमान कायदेशीर वय १८ वर्षे ठेवण्यात आले आहे. लक्षणीय प्रमाण म्हणजे 15-19 वयोगटातील प्रत्येक तिसऱ्या किशोरवयीन मुलीचे लग्न झाले आहे आणि प्रत्येक दुसऱ्या विवाहित किशोरवयीन मुलीने मुलाला जन्म दिला आहे.

बालविवाहाने बालपण संपते. यामुळे मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या अधिकारांवर नकारात्मक परिणाम होतो. हे परिणाम केवळ मुलीवरच नव्हे तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही थेट परिणाम करतात. बालविवाहामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे गरिबीचे आंतर-पिढ्याचे चक्र होऊ शकते. त्यामुळे सर्वच स्तरातून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात. अहमदनगर जिल्यात स्नेहालय उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे.

अहमदनगर उस्मानाबाद येथील १६ वर्षीय मुलीचा जामखेड येथे होत असलेला बालविवाह स्नेहालय उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानाचे संचालक हनीफ शेख व चाईल्ड लाईनच्या टीमने काल रविवार होणारा बालविवाह रोखला, असताना उस्मानाबाद मधील ग्रामसेवकाच्या सहाय्याने थांबविला असून आज या मुलीला बाल संरक्षण समिती उस्मानाबाद यांचेकडे संरक्षण मिळवून देण्यासाठी हजर केले.तो विवाह थांबण्यात यश आल. तर दुसरीकडे नेवासा तालुक्यात बालविवाह लावल्याबद्दल दोन्ही कुटुंबातील सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिंगणापूर-घोडेगाव रस्त्यावरील वस्तीवर अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची गुप्त माहिती शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना मिळाली होती.

निरीक्षक कर्पे यांनी शिंगणापूरचे ग्रामसेवक व पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत बालविवाह लावल्याबद्दल दोन्ही कुटुंबातील सात जणांवर गुन्हे दाखल केले.याबाबत शिंगणापूरचे ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी दादासाहेब नारायण बोरुडे यांनी फिर्याद दिली की दि. 24 रोजी दुपारी 1 वाजता मुलगी 18 वर्ष वयापेक्षा कमी असल्याचे माहित असूनही बालविवाह लावला. वरून आरोपी लहू बाळासाहेब कल्हापुरे, बाळासाहेब धोंडीराम कल्हापुरे, उषाबाई बाळासाहेब कल्हापुरे , ज्ञानदेव निवृत्ती काळे, सुरेखा ज्ञानदेव काळे नेवासा), बाबासाहेब सखाहारी जाधव, वैभव बाळासाहेब शुक्रे यांच्यावर शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 149/2022 बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम 2007 चे कलम 9, 10, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. माळवे पुढील तपास करत आहेत.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!