केडगांव येथील सिटी सर्व्हे मधील गलथान कारभार लवकर सुरळीत करा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी यांना मागणी.
अहमदनगर प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आले की केडगांव येथील सिटी सर्व्हे मधील गलथान कारभार लवकर सुरळीत करा यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे व पदाधिकारी उपस्थित होते.
साधारण दिड वर्षापासून केडगाव तलाठी कार्यालयाचे ८०% ते ९०% काम हे नगर सिटी सव्र्हेकडे वर्ग करण्यात आले आहे, परंतू कुठल्याही प्रकारचे काम सिटी सर्व्हे विभागातुन होत नसल्यामुळे केडगाव येथील नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. ते १० दिवसांचा कालावधी असलेल्या कामासाठी दिड वर्षापासून नागरीक हेलपाटे मारत आहेत. तलाठी ऑफिसमध्ये देखील कुठल्याही प्रकारचे काम होत नाहीत. तसेच सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये देखील कुठल्याही प्रकारचे काम होत नाही. तातडीची मोजणी करणेसाठी लागणारे शुल्क भरुनही ७ ते ८ महिन्यांपासून मोजणी होत नाही.
यात अनेक काम प्रलंबित आहेत उदा. १) वारस नोंद २) ७/१२ उतारे / फेरफार २) जुने रेकॉर्ड / आदेश प्रत ३) मोजणी नकाशे ५) मोजणी काम ६) क्षेत्रातील त्रुटी ७) पोट हिस्से ८) टिपणी नकाशे / रेकॉर्ड असे अनेक काम सिटी सर्व्हे कार्यालयाच्या अंतर्गत येतात, परंतू वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारल्यास पुरेसा कर्मचारी वर्ग कमी असल्याची कारणे दिली जातात. एका सर्व्हेअर कडे १६ / ९८ गाव आहेत त्यामुळे प्रत्येक कामास कार्यालयीन वेळेपेक्षा १० पट जास्त वेळ लागतो. तरी कर्मचाऱ्यांची भरती करणे हे शासनाचे काम आहे कर्मचारी जर कमी पडत असतील तर तातडीने भरती करावी व जनतेचा त्रास कमी करावा.
केडगांव येथील सिटी सर्व्हे मधील गलथान कारभार लवकर सुरळीत कराआहे. त्याच प्रमाणे दर्शवलेल्या कामासाठी लागणाऱ्या कालावधीचा तक्ता कार्यालयाच्या आवारात लावुन त्या प्रमाणेच काम वेळेत व्हावेत हे बंधनकारक करण्यात यावे. दि. २५ जानेवारी पर्यंत सदर सर्व मागण्या पुर्ण कराव्यात अन्यथा पिडीत नागरीकांना सोबत घेऊन दि. २६ जानेवारी पासून सिटी सर्व्हे कार्यालयाच्या दारात आमरण उपोषण करण्यात येईल असे प्रत्येक बारसे यांनी निवेदनात सांगितले.