माझं गावविदर्भ

बापरे ! शेतकरी झाडाची पाने तोडायला गेला अन् वाघ येताच होत्याचं नव्हतं झालं…

शेत शेतकरी कामासाठी जात असतो , वन्य जीव मोठ्या प्रमाणत शेत शिवारात येतात ,पशुधन हल्ला करत आहेत .देशपूरमध्येही वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठेमाजी आत्रामचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच
गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाने दुसऱ्या एका शेतकऱ्यावर हल्ला केला, या हल्ल्यातली शेतकरी आनंदराव दुधबळे याचा मृत्यू झाला. या घटनेमुळं खळबळ माजल्याने नागरिकांमध्ये वन विभागा विरोधात संतापाची लाट उसळली.

वाघांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून आज पुन्हा एकदा वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केला.आरमोरी शहाराजवळ असलेल्या रामाळा येथे ही थरारक घटना घडली. शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेली शिंदी वृक्षाची पाने तोडण्यासाठी एक शेतकरी जंगलात गेला होता. त्यानंतर समोरूनयेणाऱ्या वाघाने शेतकऱ्यावर झडप घातली.

या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. आनंदराव दुधबळे असं मृत पावलेल्या शेतकऱ्याचं नावं आहे. या धक्कादायक घटनेमुळं येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!