महाराष्ट्रात खरं कोणी बोलायचं नाही, जो बोलेल त्याचा गेम होतो. – इंदुरीकर महाराज.
इंदुरीकर महाराज म्हंटल तर अनेकांच्या भुवया उंचावतात कारण महाराज कीर्तनातून अनेकाचा समाचार घेतात .त्यामुळे इंदुरीकर महाराज काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष असत आता महाराज म्हणतात की महाराष्ट्रात खरं कोणी बोलायचं नाही, जो बोलेल त्याचा गेम होतो… कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात ते बोलत होते.श्री साई पालखी परिवार विदर्भ आणि साई भक्त साई सेवक परिवारच्यावतीने गुरूवारी नाचू कीर्तनाचे रंगी हा इंदोरीकर महाराज यांचा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाल येथील चिटणवीस पार्क येथे झालेल्या या कीर्तन सोहळ्याला मोठ्या संख्येने नागपूरकर उपस्थित होते
आपण सगळे एकाच देवाची लेकरे आहोत, सर्वांचे रक्त लाल आहे, पेशी, मेंदू प्रत्येकाला दिला आहे. मनुष्याला तो देव आहे याचे ज्ञान नाही. देव पाहायचा नाही तर देव बनायचे आहे. ज्ञान आले तर देव बनाल असे जीवनतत्त्वज्ञान सांगत असताना इंदुरीकर महाराज यांनी महाराष्ट्रात खरं बोलणाऱ्यांचे काय हाल होतात याचे वास्तव मांडले. महाराष्ट्रात खरं कोणी बोलायचं नाही, जो बोलेल त्याचा गेम होतो.. असा संदेश आपल्या खास विनोदी शैलीने दिला. आजच्या जीवनपद्धतीवर भाष्य करत त्यांनी आपल्या कीर्तनातून सर्वांना हसविले.
पैसा, सत्ता, संपत्ती आपल्या कामी येत नाही. दहा मिनिटांत आजीचा माजी होतो हे कळतही नाही. त्यामुळे ताकद, पैसा आणि सत्तेचा योग्य वापर करा. चांगले वागणे कधीच वाया जात नाही. झाडांना पाणी द्या, शक्य तेवढ्या लोकांना मदत करा, असा सल्ला इंदुरीकर महाराजांनी दिला. आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे. धर्मासाठी एकत्र या. प्रत्येकाने आपला धर्म पाळायला हवा.
तीने माझे हृदय तोडले म्हणून आयुष्य संपविणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशांचा आपल्या खास शैलीत इंदुरीकर महाराजांनी समाचार घेत आपला जीव मोलाचा असल्याचे सांगितले. देश, राष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिले ते खरे प्रेम आहे, असे इंदुरीकर महाराज म्हणाले. रक्ताचे नातेही कामी येत नाही, असा करोनाचा काळ आपण अनुभवला आहे. त्यामुळे माया कमी करा, असे केले तर बोध नावाचा मुलगा जन्माला येईल. मोबाइलचा वापर कमी करा नाहीतर मनोरुग्ण व्हाल हे पटवून देताना फोनवर बोलणाऱ्यांच्या मजेशीर नकलाही त्यांनी यावेळी करून दाखविल्या. माहिती दिल्यानंतर यावर तुमचे काय म्हणणे आहे.. ये… असे उच्चारून वेळोवेळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. जिथे जाल तिथे तुळशी लावा, एक देऊन कमी बांधा, पण शाळा काढा, संत साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश व्हावी अशी अपेक्षाही इंदुरकर महाराजांनी व्यक्त केली.