UPSC

आई असतानाही अनाथ म्हणून राहिले; तिसऱ्या प्रयत्नात झाले IAS अधिकारी. पहा जीवनकथा

आजवर आपण पहिले आहे कि, आयुष्यात यश त्यांनाच मिळाले आहे ज्यांनी जीवतोड कष्ट आणि एक हेतू ठेवून त्या मार्गाने आपल काम केले आहे. आपल्या कामात आपण प्रामाणिक असाल तर त्याचा निकाल पण तसाच असणार आहे. आपण बऱ्याच सक्सेस स्टोर्या पहिल्या आहेत पण या कहाणी मध्ये जरा वेगळेपण आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते आपण पाहूया,

मूळचे केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यातील एडवन्नापारा या गावचे मोहम्मद अली शिहाब, त्यांचा जन्म 15 मार्च 1980 रोजी कोरोत अली आणि फातिमा यांच्या घरी झाला. शिहाब यांना एक मोठा भाऊ, एक मोठी बहीण आणि दोन लहान बहिणी आहेत. शिहाब यांचं बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेलं. लहानपणापासून त्यांनी खूप संघर्ष केला आहे. मात्र ते कधीही कोणत्याही संकटाला घाबरले नाहीत आणि आपलं लक्ष्य साध्य करण्याकडे वाटचाल करत राहिले.

आयुष्यातील छोट्या-मोठ्या अपयशांना घाबरणाऱ्या लोकांसाठी केरळचे रहिवासी असलेल्या मोहम्मद अली शिहाब यांची जीवनकथा खूप प्रेरणादायी ठरू शकते. शिहाब लहानपणी वडिलांसोबत बांबूच्या टोपल्या आणि पानं विकायचे. 31 मार्च 1991 रोजी शिहाब यांच्या वडिलांचं आजारपणामुळे निधन झालं. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी शिहाबच्या आईच्या खांद्यांवर आली. त्यांची आई फारशी शिकलेली नव्हती आणि ती आपल्या पाच मुलांचं संगोपन नीट करू शकत नव्हती.

वडिलांच्या मृत्युनंतर केवळ दोन महिन्यांनी त्यांच्या आई फातिमा यांनी त्यांचा 11 वर्षांचा मुलगा शिहाब, 8 वर्षांची मुलगी सौहराबी आणि 5 वर्षांची मुलगी नसीबा यांना कोझिकोड येथील कुट्टीकट्टूर मुस्लिम अनाथाश्रमात पाठवलं. तिन्ही भावंडं लहान वयातच घरापासून दुरावली गेली. शिहाब यांनी अनाथाश्रमात राहून बारावी आणि प्री-डिग्रीचं शिक्षण घेतलं. त्यांच्या आयुष्यात ते आई असूनही एकप्रकारचे अनाथ होते.

जवळजवळ 10 वर्षे त्यांनी अनाथाश्रमात राहिल्यानंतर शिहाब घरी परतले. त्यानंतर त्यांनी डिस्टन्स मोडमध्ये अभ्यास सुरू केला. शिहाब आतापर्यंत सरकारी नोकऱ्यांसाठी 21 परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. 2004 मध्ये त्यांनी शिपाई, त्यानंतर रेल्वे तिकीट परीक्षक तसेच जेल वॉर्डन म्हणूनही काम केलं आहे. इतर नोकऱ्या करत असताना शिहाब यूपीएससी परीक्षेची तयारी करत होते. याचदरम्यान मोहम्मद अली शिहाब यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागला.

त्यामुळे पहिल्या दोन प्रयत्नांत त्यांना यश आलं नाही. पण त्यांनी हार न मानता आपली तयारी चालू ठेवली. 2011 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात शिहाब यांनी UPSC परीक्षा पास केली. त्यांनी ऑल इंडिया लेव्हलवर 226 वी रँक मिळवली होती. यूपीएससीच्या मुलाखतीसाठी त्यांच्यासाठी ट्रान्सलेटर नेमण्यात आला होता. अगदी लहान लहान समस्या, अडचणींमुळे खचून जाण्याऱ्या व त्यासाठी काम अर्धवट सोडणाऱ्या लोकांसाठी मोहम्मद अली शिबाह यांची ही कहाणी खरंच खूप प्रेरणादायी आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!