” माझ्या आयुष्यात आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. ” असे म्हणत एका डॉ महिलेने उचलले टोकाचे पाऊल.

अनेकदा माणूस नैराश्यातून नको ते टोकाचे पाऊल उचलत असतो. त्यामागील कारण देखील तशीच असतात. मानसिक रित्या दुखवले गेले कि असे पर्याय लोक निवडतात. अशीच एक घडणा घडली आहे. आता माझ्या आयुष्यात काहीच राहिलेलं नाही. जगण्यासाठी आशेचा कोणताच किरण दिसत नाही, सॉरी, असं म्हणत जोधपूरमधील एका डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली आहे. कित्येक वर्षे मेहनत करून तरुणी डॉक्टर झाली. आयुष्यात तिची अनेक स्वप्नं होती. मात्र सर्व स्वप्नं अधुरी ठेऊन तिनं जगाचा निरोप घेतला.
रविवारचा दिवस जोधपूरमधील मथुरादास रुग्णालयासाठी अतिशय वेदनादायी ठरला. संध्याकाळपर्यंत सगळं व्यवस्थित सुरू होतं. रुग्णालयाच्या वसतिगृहातील तरुणी नेहमीप्रमाणे त्यांची कामं आटपत होत्या. याच रुग्णालयात निवासी डॉक्टर सोनाली विजय राहायची. २९ वर्षांच्या सोनालीला बोलावण्यासाठी तिच्या खोलीजवळ गेल्या असत्या तिचा अनेकदा दरवाजा ठोठावला. पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मग नंतर मैत्रिणींनी फोन करून पाहिले. पण त्यात सोनाली फोनही उचलेना. आणि म्हणून मैत्रिणींनी दरवाजाची कडी तोडली.
सोनालीच्या मैत्रिणी तिच्या खोलीत पोहोचल्या. त्यावेळी ती बेशुद्धावस्थेत होती. तिच्या शेजारी ऍनेस्थेशियाची इंजेक्शन्स होती. सोनालीला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिचा मृत्यू झाला होता. ऍनेस्थेशियाच्या ओव्हरडोसमुळे सोनालीचा जीव गेला. तिनं आत्महत्या केली. सोनालीच्या निधनानं तिच्या मैत्रिणींना तर धक्का बसलाच पण सोनालीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
यामध्ये मिळालेली माहित अशी आहे कि, सोनालीच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात तिने असे लिहिले होते कि, ” माझ्या आयुष्यात आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. जगण्याची कोणतीच आशा नाही.” असा मजकूर त्यात होता. जगाचा निरोप घेताना सोनालीनं कुटुंबीयांची माफी मागितली. सोनालीच्याच रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉ. अंकित सोबतचे संबंध आत्महत्येस कारण ठरले. अंकित विवाहित होता काही दिवसांपूर्वीच अंकित आणि सोनाली यांच्या प्रेमसंबंधांची माहिती अंकितची पत्नी आकांक्षाला समजली होती.
डॉ. आकांक्षानं रुग्णालयात येऊन सोनालीशी वाद घातला होता. तसेच तिला बरंच काही सुनावलं होत. त्यानंतर आकांक्षानं सोनालीच्या कुटुंबायांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांना सांगितला. सोनालीच्या कुटुंबीयांना झालेला प्रकार आवडला नाही. त्यांनी सोनालीला समजावण्याचा प्रयत्न देखील केला. घडलेल्या घटनांमुळे सोनाली तणावाखाली होती. एका बाजूला कुटुंबाला दुखवायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला डॉ. अंकित सोबतच्या प्रेमसंबंधात आलेल्या अडचणी अशा परिस्थितीत सोनाली अडकली. आणि म्हणूनच तिनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आणि आपले जीवन संपवले.